जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त […]
जळलेला मोहर – वि स खांडेकर (कादंबरी विवेचन)
वि स खांडेकर यांची कादंबरी वाचणे म्हणजे शब्द – भावनांच्या शांत तळ्यात पाय ठेवून वाङ्मयीन आनंदाचे क्षितिज बघण्यासारखे आहे. जळलेला मोहर ही कादंबरी मांडणी आणि विषय यांच्या बाबतीत, वि स खांडेकर यांनी लिहिलेल्या कादंबरींपैकी अत्यंत वेगळी आहे. शरीर आणि शरीराची भूक हे प्राणिजगतातील अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत विषय आहेत. अर्थातच माणूस देखील यापासून स्वत:ला दूर […]
मनुस्मृति : भेसळ आणि संदर्भहीन दिशाभूल
आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप […]
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले – संत तुकाराम महाराज (भावार्थ)
एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।। गाढव आणि ब्रह्मचर्य संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात […]
बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – बुद्धाचा ऱ्हाटलेखक – उत्तम कांबळे प्रकाशक – मनोविकास प्रकाशन (ISBN 9789385266515)अधिकार – उत्तम कांबळे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ आहे म्हणजेच साधारण १९५०. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्याबरोबर करोडो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला या घटनेच्या पार्श्ववभूमीवर ही कथा घडते. देश स्वतंत्र झाला तरीदेखील आपण स्वतंत्र झालेलो नाही, माणूस झालेलो नाही, वर्षानुवर्षांची जातीची […]
सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही – आरती प्रभू
“सर्सर सर्सर वाजे” आरती प्रभू यांची एक अप्रतिम निसर्गकविता जिला मानवी अनुभवविश्वाचे संदिग्ध गोंदण लाभले आहे. आरती प्रभू म्हणजे अर्थातच खानोलकर यांच्या कवितेत कायमच एक प्रकारची अस्वस्थता, उणीव आणि रुखरुख जाणवते. आरती प्रभू अस्सल हाडाचे कवी आणि कलावंत होते. एखाद्या कलावंताचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि अनुभवले. कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा मनस्वी कवी नेहमीच […]
पंचचामर वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – पंचचामर वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ + १५ वृत्त अक्षर संख्या – ११ + ११ गणांची विभागणी – ज, र, ज, र, ज, ग (ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा) यति – इंद्रवज्रा आणि […]
नेणीव म्हणजे काय?
“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
बोअरिंग जॉब? ऐका भगवद्गीता काय सांगते
प्रत्येकाच्या आजूबाजूला किमान एक व्यक्ती तरी असतेच जिला आपला जॉब बोअरिंग वाटत असतो, कंटाळवाणा वाटत असतो. त्या व्यक्तीला जर आपण विचारलं “मग कशाला करतोयस हे काम?” तर ती व्यक्ती कुटुंब, अर्थार्जन इत्यादींचा आधार घेत म्हणते “पर्याय नाही”. अशा वेळेस त्याला काय उत्तर द्यावं किंवा सांगावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर, “निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान” अवघ्या […]