शिवरायांचे गुप्तहेर खाते किती जबरदस्त होते हे त्यांनी केलेल्या यशस्वी मोहिमा, परिणामकारक हल्ले आणि रणनीतीमधील शिताफीवरुन उघड आहेच. पण त्यांच्या गुप्तहेरखात्याबद्दल फार कुणाला काही अवगत नाही हे ही त्या खात्याचे एक यशच आहे हे आपण विश्वासराव नानाजी प्रभु दिघे मुसेखोरेकर यांच्यावरील ब्लॉगवरून सिद्ध होतेच. पण तरीही जो काही ऐतिहासिक मजकूर, पत्रे इत्यादी साहित्य उपलब्ध आहे […]
हेटकरी – महान मराठी योद्धे (Hetkari – Ferocious Maratha Warriors)
हेटकरी आणि मावळे “शिवकाल” म्हटलं की एक शब्द आपोआप मनात उमटतो तो म्हणजे मावळे! मराठ्यांचे सैन्य म्हटले की मावळे असे जणू एक समीकरणच झालेले आहे. खरं तर मावळ प्रांतात जे राहतात ते मावळे या हिशोबाने शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुतेक सगळे सैनिक आणि योद्धे मावळातीलच होते असं म्हणावं लागेल. पण, वस्तुस्थिती तशी नाही. इतिहासाची पाने ओलांडताना, […]
विश्वासराव नानाजी प्रभु दिघे देशपांडे मुसेखोरेकर – शिवरायांचे (अपरिचित) गुप्तहेर
कोणत्याही साम्रज्याच्या गुप्तहेर खात्याबद्दल विशेष माहिती न मिळणे हे खरं तर त्या गुप्तहेर खात्याचे यशच आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल देखील असंच आहे. शिवरायांच्या गुप्तहेरांबद्दल फारशी माहिती कुठे मिळत नाही. फक्त काहीच ठिकाणी त्यांचा थोडा फार उल्लेख केलेला आहे. त्यावरूनच समजतं की शिवरायांचे गुप्तहेर खाते किती कर्तव्यदक्ष होते. शिवकालीन गुप्तहेर म्हटलं की पहिलं नाव […]
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड – प्रवास, इतिहास आणि किस्से
आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून शिवाजी महाराज अनेक गावे, राज्ये आणि वने पादाक्रांत करत शेवटी राजगडला पोहोचले. या प्रवासाबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळे उल्लेख, इतिहास, किस्से आणि छत्रपती ज्या मार्गाने राजगडला पोहोचले तो मार्ग या ब्लॉग मध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज – काबुल आणि अफवांचे पीक
काबुल ? “छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” या विषयावर संशोधन करत असताना त्या काळातील पत्रव्यवहारांमध्ये एक फार विचित्र गोष्ट समोर आली. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांना बळजबरीने किंवा एका षड्यंत्रात फसवून “काबुल” ला पाठवणार होता! होय! काबुल ला.. त्या काळच्या दोन पत्रकांमध्ये या गोष्टीचा (अफवेचा!) उल्लेख दिसतो. आम्ही याला “अफवा”च मानतो कारण वास्तव हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कधीही काबुल ला गेल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. आम्हालाही ही […]
छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र
हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते.
इंद्र जिमि जम्भ पर
महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी अनेक वीररसयुक्त काव्ये रचली. त्यातील “इंद्र जिमि जम्भ पर” हे काव्य मराठी चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे अधिक प्रकाशात आले. महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी रचलेल्या “इंद्र जिमि जंभ पर” या काव्याचा मराठी रसास्वाद इन्द्र जिमि जंभ पर , बाडब सुअंभ पर ।रावन सदंभ पर , […]
शिवछत्रपती
देशी गनिमी उत्पात । स्वकीयांनी केला घातराहिली ना अब्रू घरात । जावे कोठे ?।। देवळे जाहली माती । संतांच्या जाळील्या पोथीस्वधर्म सोडूनी जाती । केविलवाणे ।। मावळ रक्तात न्हाता । सह्याद्री क्षीण होताजाहली तयांची माता । शिवनेरी ।। सांडोनी स्वतःचे जगणे । हिंदवी राज्य कारणेराज्याची बांधिली तोरणे । कडेकपारी ।। कुणी उमराव सरदार । पातशाहीचे […]