इतिहासाची पाने चाळत असताना “सर आयझॅक पिटमन” यांचे नाव समोर आले. Onthisday च्या मते १२ जानेवारी १८९७ ला मृत्यू झाला आणि विकिपीडिया नुसार त्यांच्या मृत्यू २२ जानेवारी १८९७ रोजी झाला. इंग्रज मंडळी सुद्धा स्मृतिदिन तिथीनुसार आणि तारखेनुसार असे पाळतात की काय!? असो, विनोदाचा भाग सोडून देऊ पण, सर आयझॅक पिटमन यांच्याबद्दल माहिती वाचली तेव्हा मात्र […]
“कोरेगाव भीमा”चे युद्ध, ऐतिहासिक नोंदी, वास्तव आणि प्रश्न
कोरेगाव भीमा येथे लढले गेलेले मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्ध राजकीय कारणांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या बाजूने या युद्धाचे नेतृत्व बाजीराव पेशवे द्वितीय करत होते. इंग्रजांच्या बाजूने एल्फिन्स्टन नेतृत्व करत होता. या युद्धाबद्दल ज्याला जे पसरवावंसं वाटतं तो ते पसरवतो. आणि आवाज चढवून बोलणाऱ्या किती जणांनी या युद्धासंदर्भात उपलब्ध असलेली ऐतिहासिक साधने अभ्यासलेली असतात हे […]
विठ्ठलराव देवाजी दिघे (काठियावाड दिवाणजी) – अपरिचित समाजसुधारक
३ डिसेंबरला सगळ्यांनी इंग्रजांनी सती प्रथा कायदा करून शिक्षापात्र गुन्हा बनवला हे वाचलेलं आहे. त्यावरून इंग्रजांची बरीच वाहवा केली जाते. अनेक प्रश्न मनात येतात भारतात फक्त ही एकच कुप्रथा होती का? फक्त हिंदूंमध्येच कुप्रथा होत्या का? आहेत का? इंग्रज सोडून बाकी कोणी राज्यकर्त्याने काही विशेष केले नाही का? पण फारसे चांगले उत्तर मिळाले नाही. तेव्हा […]
सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नी – एक अपरिचित वीरांगना
भारतीय इतिहास आणि सरदार त्र्यंबकजी डेंगळे भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये १८०० ते १८२० दरम्यानचा महाराष्ट्राचा इतिहास केवळ आणि केवळ भारतीयांना, इथल्या शूरवीरांना आणि मराठ्यांच्या साम्राज्याचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांना दूषण दिल्याचेच दिसते. माझ्या मते इतिहासकारांनी आपल्या वीरपुरुषांबद्दल अफवा आणि अपप्रचार करून मोठा अन्याय केलेला आहे. त्यात भर पडली सामाजिक द्वेषाची. त्यामुळेच आजकाल भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला […]
बाजीराव पेशवे द्वितीय आणि मिथ्या आरोप
बाजीराव पेशवे आणि ब्राह्मणांची बदनामी १ जानेवारी तारीख जवळ आली की अर्थातच कोरेगावचे युद्ध, आणि बाजीराव पेशवे द्वितीय यांची आठवण येते. हा दिवस जवळ येताच, आपण कोणाला कोणत्या नियमाने देशभक्त मानतो आणि आपल्या इतिहासाची किती माहिती आहे? याचे स्वैर प्रदर्शन मांडले जाते. असो, त्याबद्दल पुढे कधी लिहूच. पण बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याबद्दल वाचन सुरु असताना […]
घटकंचुकी – एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा
घटकंचुकी – आमचा संदर्भ घटकंचुकी, दोन तीन दिवसांपूर्वीच हा शब्द प्रथम वाचनात आला. इतिहासाबद्दल वाचन करत राहणे हा आमचा आवडता उद्योग. एका बहुचर्चित मराठे – इंग्रज युद्धाच्या पाऊलखुणा आणि सत्यता शोधत होतो. तेव्हा दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्याबद्दल काही साधने वाचत असताना इतिहासाचार्य राजवाडे यांचे “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” हे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकात भारतातील विवाहाच्या, […]
लोकमान्य टिळकांचे किस्से
नमस्कार, लोकमान्य टिळक हे नाव माहित नसलेले लोक शोधूनच काढावे लागतील. पण आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या “टरफले” आणि “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” किंवा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” अशा दोन तीन गोष्टी सोडल्या तर विशेष काहीच माहित नसतं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासकारांनी लोकमान्य टिळकांना फक्त केसरी, मराठा, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहेत. […]
त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर
त्रिशुंड गणपती – थोडी पार्श्वभूमी काही कलाकृती, काही जागा आणि काही मंदिरे दुर्दैवाने अपरिचित राहतात. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे असेच एक अत्यंत अपरिचित, दुर्लक्षित आणि अद्भुत मंदिर! १७५४ च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. हिंदू मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत. हिंदू मंदिर ही कला, श्रद्धा आणि इतिहास यांचा […]
भवानी पेठेचा इतिहास आणि थोरले माधवराव पेशवे
महाराष्ट्रातील उद्योगधंदे, त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर समस्या यांच्यावर सध्या फार चर्चा सुरु आहे. नगर आणि उद्योग यांचा इतिहास माहित असणारे जाणतात की कोणतेही उद्योग उभे करणे, सुरु ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे. इतिहासातील प्रत्येक काळातील राज्यकर्त्यांना हे आव्हान पेलावे लागले आहे. उद्योगधंदे आणि पेठ वसवणे सोपे नसते. उद्योगधंद्यांना देखील सवलती आणि राजकीय […]
प्रजादक्ष छत्रपती शिवाजी महाराज – १६ ऑक्टोबर १६७३ चे एक पत्र
शिवाजी महाराजांची महती सांगणे हे म्हणजे सूर्य तेजपुंज आहे हे सांगण्यासारखं आहे. आपण या आनंदवनभुवन राजाच्या भूमीत जन्म घेतला हेच मोठे पुण्य आहे. इतिहासाचा अभ्यास करताना वेळोवेळी शिवाजी महाराजांची पत्रे समोर येतात. अशा पत्रांना ऐतिहासिक विषयांच्या अभ्यासाच्या साधनांत अनन्यसाधारण महत्व आहे, अनेकदा बखरींपेक्षा अधिक. कारण, बखरी इतर कोणीतरी लिहिलेल्या असतात, त्याच्यात लिहिणाऱ्याची सापेक्ष बुद्धी डोकावण्याची […]