महाराष्ट्रातील उद्योगधंदे, त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर समस्या यांच्यावर सध्या फार चर्चा सुरु आहे. नगर आणि उद्योग यांचा इतिहास माहित असणारे जाणतात की कोणतेही उद्योग उभे करणे, सुरु ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे. इतिहासातील प्रत्येक काळातील राज्यकर्त्यांना हे आव्हान पेलावे लागले आहे. उद्योगधंदे आणि पेठ वसवणे सोपे नसते. उद्योगधंद्यांना देखील सवलती आणि राजकीय […]
“कांतारा” एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव
“कांतारा” बद्दल थोडं रिषभ शेट्टी दिग्दर्शित “कांतारा” हा चित्रपट नसून एक अनुभव आहे. एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत कलाकृती. आयुष्यात कधीही न ऐकलेल्या परंपरेबद्दल, अनोळखी भाषेत बनवलेली आणि त्या समाजाबद्दल काहीही कल्पना नसून, एक क्षणही पापणी लवू न देणारी ही कलाकृती. मी या चित्रपटाला फक्त चित्रपट समजत नाही. ही शुद्ध कलाकृती […]
एक पावसाळी रात्र – फांदीवरून उडून गेलेला पक्षी
आभाळाच्या झाडावर मेघांचे घरटे थरथर होते. मला माझा एकांत सहसा सलत नाही पण हा एकटेपणा मात्र खायला उठतो. पाऊस सुरू आहे, संथ.. अविरत जणू त्याला मृत्यूचे भयच नाही. अल्लड झालाय हल्ली म्हणे. विचारांनी मला वेढून टाकलंय म्हणू की मी विचारांचे पांघरूण केलयं म्हणू? प्रत्येक प्रसंग अनुभवांच्या पन्हाळीतून आपली ओल मागे ठेवत वाहतोय, एका अगम्य आणि […]
प्रजादक्ष छत्रपती शिवाजी महाराज – १६ ऑक्टोबर १६७३ चे एक पत्र
शिवाजी महाराजांची महती सांगणे हे म्हणजे सूर्य तेजपुंज आहे हे सांगण्यासारखं आहे. आपण या आनंदवनभुवन राजाच्या भूमीत जन्म घेतला हेच मोठे पुण्य आहे. इतिहासाचा अभ्यास करताना वेळोवेळी शिवाजी महाराजांची पत्रे समोर येतात. अशा पत्रांना ऐतिहासिक विषयांच्या अभ्यासाच्या साधनांत अनन्यसाधारण महत्व आहे, अनेकदा बखरींपेक्षा अधिक. कारण, बखरी इतर कोणीतरी लिहिलेल्या असतात, त्याच्यात लिहिणाऱ्याची सापेक्ष बुद्धी डोकावण्याची […]
कांचन आणि आपट्याचे पान ।
दसरा आला की मला आपट्याच्या पानांपेक्षा जास्त आठवण येते ती कांचनाच्या पानांची! कवी ग्रेस यांचे एक वाक्य आहे, “रामाच्या वनवासाची खरी भागीदारीण झाली उर्मिला”. कांचनाच्या पानांची मला थोडी फार तशीच गत वाटते. वर्षानुवर्षे लोक आपट्याची पाने म्हणून कांचनाची पाने ओरबाडत आहेत, बाजारात विकत आहेत आणि विकत घेणारे विकत घेत आहेत. एखाद्याने अभागी असावे तरी किती? […]
“सुंदरजी प्रभु” – विस्मृतीत गेलेले शिवरायांचे गुप्तहेर
शिवरायांचे गुप्तहेर खाते किती जबरदस्त होते हे त्यांनी केलेल्या यशस्वी मोहिमा, परिणामकारक हल्ले आणि रणनीतीमधील शिताफीवरुन उघड आहेच. पण त्यांच्या गुप्तहेरखात्याबद्दल फार कुणाला काही अवगत नाही हे ही त्या खात्याचे एक यशच आहे हे आपण विश्वासराव नानाजी प्रभु दिघे मुसेखोरेकर यांच्यावरील ब्लॉगवरून सिद्ध होतेच. पण तरीही जो काही ऐतिहासिक मजकूर, पत्रे इत्यादी साहित्य उपलब्ध आहे […]
सध्याचे ऐतिहासिक चित्रपट आणि उथळ विचार
माझ्या आयुष्यात घडलेली घटना.. एक जण गेल्या ५-७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिका व चित्रपट यांचे दाखले देत तावातावाने मुद्दे मांडायचा प्रयत्न करत होता.त्याला साधा प्रश्न विचारला “आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांबरोबर कोण कोण होते आणि त्यांना कोणी कोणी मदत केली?”तेव्हापासून बिचारा ऑफलाईन आहे! ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांच्यात दाखवल्या जाणाऱ्या घटना, त्या ज्या पद्धतीने मांडल्या जात […]
हेटकरी – महान मराठी योद्धे (Hetkari – Ferocious Maratha Warriors)
हेटकरी आणि मावळे “शिवकाल” म्हटलं की एक शब्द आपोआप मनात उमटतो तो म्हणजे मावळे! मराठ्यांचे सैन्य म्हटले की मावळे असे जणू एक समीकरणच झालेले आहे. खरं तर मावळ प्रांतात जे राहतात ते मावळे या हिशोबाने शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुतेक सगळे सैनिक आणि योद्धे मावळातीलच होते असं म्हणावं लागेल. पण, वस्तुस्थिती तशी नाही. इतिहासाची पाने ओलांडताना, […]
विश्वासराव नानाजी प्रभु दिघे देशपांडे मुसेखोरेकर – शिवरायांचे (अपरिचित) गुप्तहेर
कोणत्याही साम्रज्याच्या गुप्तहेर खात्याबद्दल विशेष माहिती न मिळणे हे खरं तर त्या गुप्तहेर खात्याचे यशच आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल देखील असंच आहे. शिवरायांच्या गुप्तहेरांबद्दल फारशी माहिती कुठे मिळत नाही. फक्त काहीच ठिकाणी त्यांचा थोडा फार उल्लेख केलेला आहे. त्यावरूनच समजतं की शिवरायांचे गुप्तहेर खाते किती कर्तव्यदक्ष होते. शिवकालीन गुप्तहेर म्हटलं की पहिलं नाव […]
आभाळमाया.. आभाळमाया (गाण्यात नसलेल्या कडव्यासह संपूर्ण कविता)
क्वचितच कोणी मराठी माणूस असेल ज्याला “आभाळमाया” शीर्षक गीत माहित नाही. मंगेश कुळकर्णी यांचे अत्यंत हळुवार पण गभीर शब्द, अशोक पत्की यांचे मनाला भावणारे संगीत आणि सांजेच्या किरणांसारखे वाहून येणारे देवकी पंडित यांचे स्वर. हे गाणं ऐकताना एका वेगळ्याच विश्वास पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. पण, गाण्यात या कवितेची सगळी कडवी घेतलेली नाहीत. या काव्याचे रसग्रहण मी […]