संथ वाहते कृष्णामाई – एका दुपारची गोष्ट संध्येच्या दिशेने झुकत चाललेल्या एका निवांत दुपारी गिटार वाजवत असताना अचानक राग “वृंदावनी सारंग” चे काही स्वर आपोआप छेडले गेले आणि नकळत “संथ वाहते कृष्णामाई” या गीताचे बोल वाजवू लागलो. लहानपणापासून हे गाणे ऐकत आलेलो आहे. या नितांत सुंदर आणि भावपूर्ण गीताचे बोल मला वाजवता आले याचा आनंद […]
मस्तानी – स्वरचित कविता
मस्तानी.. मस्तानी इतकी अवांछिलेली, दुस्वास सहन केलेली स्त्री इतिहासात क्वचितच आढळेल. जिच्या सौंदर्याबद्दल लोकांनी बरंच काही लिहिलेलं आहे, चितारलेलं आहे अशी ही मस्तानी. यवनी गर्भात उमललेली हिंदुस्थानी गुलाबाची कळी. जिच्या सौंदर्याला आणि शौर्याला वास्तवाच्या काट्यांची वेढलेले आहे. राजकारणाच्या खेळात तिचा हात राऊंच्या हाती दिला गेला खरा पण राऊंना देखील याची कल्पना नव्हती की राजकारण म्हणून […]
अखंड सावधान असावे – समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र
नुकतीच दासनवमी होऊन गेली. श्री समर्थ रामदास स्वामींचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व इतके अगाध आणि प्रचंड आहे की, आमच्या मते अजूनही त्यांची योग्यता पूर्णतः लोकांच्या लक्षात आलेली नाहीये. ऐकीव माहिती, राजकीय कारस्थाने आणि ऐतिहासिक अभ्यासाचा अभाव या विखारी त्रयीनीं अनेक महापुरूषांप्रमाणे समर्थ रामदास स्वामींचे चरित्र देखील सामान्य माणसाच्या आकलनापासून दूर नेवून ठेवलेले आहे. तरीही समर्थांचे इतके […]
आभाळमाया.. आभाळमाया (गाण्यात नसलेल्या कडव्यासह संपूर्ण कविता)
क्वचितच कोणी मराठी माणूस असेल ज्याला “आभाळमाया” शीर्षक गीत माहित नाही. मंगेश कुळकर्णी यांचे अत्यंत हळुवार पण गभीर शब्द, अशोक पत्की यांचे मनाला भावणारे संगीत आणि सांजेच्या किरणांसारखे वाहून येणारे देवकी पंडित यांचे स्वर. हे गाणं ऐकताना एका वेगळ्याच विश्वास पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. पण, गाण्यात या कवितेची सगळी कडवी घेतलेली नाहीत. या काव्याचे रसग्रहण मी […]
चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे
आज २९ ऑगस्ट, इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन सुद्धा. इन्ग्रिड बर्गमन मला आधीपासून माहित होतीच पण तिचा आणि माझा, माझ्या माहितीपेक्षा अधिक जवळचा संबंध आहे हे नंतर समजलं. माणिक गोडघाटे नावाच्या कवीने स्वतःसाठी “ग्रेस” हे टोपणनाव का निवडले? याबद्दल मला कायम कुतुहल वाटायचे. त्याचे उत्तर ग्रेसने एका मुलाखतीत दिले. की इन्ग्रिड बर्गमन यांचे वर्णन […]
विंचू चावला – संत एकनाथ महाराजांची मूळ रचना आणि त्याचा भावार्थ
विंचू चावला -पार्श्वभूमी खरं सांगायचं तर सर्वसामान्य मराठी माणसाला संत एकनाथ महाराज आणि त्यांची भारुडे हा अपरिचित विषय नाही. त्यातून “विंचू चावला” हे भारूड तर न माहित असणं अत्यंत विरळाच. पण हा माझा समज दुर्दैवाने दूर झाला, जेव्हा एका तरुणीने सांगितले की तिला हे माहीतच नव्हते की “विंचू चावला” हे एक अध्यात्मिक काव्य आहे. आणि […]
“रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)
मराठी साहित्य आणि वाङ्मयीन इतिहासाबद्दल आदर असणाऱ्या सर्व रसिकांना मोरोपंत माहित नाही असं होणं अशक्य आहे. पूर्वी शालेय शिक्षणातील काव्याभ्यासाचे अबकड, मोरोपंतांच्या आर्या, वामन पंडितांची काव्ये इत्यादी असत. मोरोपंतांच्या आर्या हे मराठी साहित्यातील एक अजरामर आणि अवीट गोडीचे संग्रह आहेत. हल्ली या आर्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत (केल्या गेल्या आहेत !?). तरीही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना […]
वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता) ~ कुसुमाग्रज
टापांचा आवाज, पंडितजींचे संगीत, लता दिदींचे स्वर, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शब्द आणि शूरवीरांच्या आठवणीने चढलेले स्फुरण. “वेडात मराठे वीर दौडले सात” हे शब्द कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. मराठ्यांचे असीम शौर्य, हिंदवी स्वराज्यासाठी केलेले बलिदान, देव देश आणि धर्मासाठी उचलेले खड्ग सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहतं. मराठी साम्राज्याचा गौरवशाली धगधगता इतिहास. आणखी एक माहिती […]
वैष्णव जन तो – मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर
लहानपणापासून आपण “वैष्णव जन तो” हे भक्तीगीत ऐकत आलेलो आहोत. हे काव्य थोर गुजराती संत, कवी आणि विष्णुभक्त नरसी मेहता (नरसिंह मेहता) यांनी रचलेले आहे. पण खूप कमी जणांना माहित आहे की, या सुपरिचीत भक्तिगीताचे मूळ शब्द वेगळे आहेत. महात्मा गांधींनी आपल्या गायनात वेगळे शब्द आणले. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर […]
बोबडा बलराम – ग. दि. माडगूळकर (गदिमा) – रसग्रहण
“बोबडा बलराम” नात्याने मोठ्या पण वयाने लहान “दादा”च्या निरागसतेचे दर्शन घडवणारी गदिमा यांची एक अप्रतिम कविता. लहान वयाचा बलराम, कृष्ण सावळा आहे म्हणून यशोदेला काय काय उपाय कर म्हणजे कृष्ण गोरा होईल ते अगदी भाबडेपणाने सांगत आहे. यात “तू गोरी, मी गोरा मग हा कृष्ण काळा कसा?” असा प्रश्न देखील हा बोबडा बलराम आईला विचारतो. अत्यंत वेगळी अशी ही कविता. या कवितेला एक […]