श्री समर्थ रामदास स्वामींचा महाबळेश्वर आणि परिसरावर काही विशेष स्नेह होता हे ऐतिहासिक सत्य आहे. समर्थांनी अनेक वर्षे महाबळेश्वर आणि परिसरात कर्म धर्म आणि राष्ट्रभक्ती यांसाठी कार्य केले. खालील काव्यात समर्थांनी महाबळेश्वर, महाबळेश्वराचा इतिहास व या भागात उपलब्ध फळे, फुले, वनस्पती, कंदमुळे व भाज्या यांचे वर्णन केलेले आहे. समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर हे काव्य रचले. यावरून […]
छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र
हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते.
इतिहासकार “जेम्स डग्लस” यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज
आग्र्याला नजर कैद होण्याआधी एक महत्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे, दिल्ली दरबारात छत्रपती आणि औरंगजेब यांच्यात झालेली आमने-सामने. आजवर इतिहासाच्या पुस्तकात आपण या भेटींदरम्यान काय झाले? यांचे वर्णन वाचलेले आहे.
हे डावे – उजवे (Left Wing – Right Wing) कुठून आले?
डावे – उजवे कुठून आले? आजकाल राजकारणाचा अभ्यास करणारे, कार्यकर्त्यांना, पक्षांना, विचारवंतांना अगदी सहजपणे डावे – उजवे (Left Wing – Right Wing किंवा Liberals – Conservatives) म्हणतात. पण, फार कमी लोकांना माहित आहे की हे डावे – उजवे कुठून आले? त्यांचा इतिहास काय आहे? या संकल्पनांचा विचारधारणेशी कमी आणि बसण्याच्या जागेशी संबंध आहे हे फारसं कुणाला माहित नसतं! पण, या संकल्पना एका दिवसात […]
.. आणि दिल्लीच्या लालकिल्यावर भगवा फडकला
२२ जुलै १७६० .. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे दिल्लीत दाखल झाले, तीन दिवसात दिल्ली काबीज झाली आणि काहीच दिवसांनी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा फडकला! पार्श्वभूमी १७५९-६० चा काळ होता. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा भगवा अटकेपार फडकला होता. मराठ्यांचे साम्राज्य आपल्या शिखरावर होते. दिल्ली, पंजाब, वायव्य सरहद्दचा मुलुख मराठ्यांच्या अधिपत्याखाली […]
आणि मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली!
मुंबईचा इतिहास अगदी मौर्यकाळापर्यंत जातो. पण अर्वाचीन इतिहासाचा विचार केल्यास मुंबईवर शेवटचे राज्य करणारे इंग्रज, हेच बऱ्याच जणांना माहित आहे. पण ही मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली कशी? हे फार लोकांना माहित नाही. जवळजवळ संबंध भारतात इंग्रजांनी राज्य बळकावण्यासाठी बरीच युद्ध केली आणि बऱ्याचदा दोन राज्यांमध्ये युद्ध भडकवली देखील. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबई […]

३० जून १९३४ आणि हिटलर नावाच्या भस्मासुराचा उदय
आपल्या सगळ्यांना हिटलर, त्याची नाझी पार्टी आणि त्याने ज्यूंवर केलेले अनन्वीत अत्याचार यांबद्दल इतिहासाच्या पुस्तकांमधून शिकवलं गेलेलं आहे. पण, जे काही शिकवलं गेलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने. मला हा प्रश्न कायम पडायचा की मुळात हिटलर सत्तेत आलाच कसा? जर्मनीचे लोक तर हुशार समजले जातात. मग त्यांनी अशा क्रूर आणि खुनशी माणसाला निवडून कसं आणलं? त्याने ज्यूंच्या विरोधात चालवलेला प्रचार सगळ्यांना माहिती आहे. पण हिटलरचा […]
विषारी टोमॅटो? – टोमॅटोचा एक रोचक इतिहास
आजच्या दिवशी म्हणजेच २८ जून १८२० साली सगळ्यांनी पहिल्यांदा हे मान्य केलं की टोमॅटो विषारी फळ नाही आणि ते खाण्यास योग्य आहे हे सगळ्यांनी मान्य केलं. ऐकायला विचित्र वाटेल पण इंग्लंड, उत्तर युरोप व अमेरिका येथे कैक वर्षे टोमॅटो हे एक विषारी फळ मानले जात होते.टोमॅटो आपण भाजी म्हणून खात असलो तरी वनस्पतीशास्त्रानुसार टोमॅटो हे […]
पुरुषदिन – एक जागतिक उदासदिन
तर आज जागतिक पुरुषदिन! काहीही लिहायच्या आधी हे सांगणं आलंच की मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. कारण स्वतः उदास झालेला माणूस कोणाच्या भावना कसा दुखवू शकतो !? कोणाला माहित आहे का काही याच्याबद्दल? अर्थात, मी हा प्रश्न विचारल्यावर बरेच जण गुगल वर शोधतील! हे ही साहजिकच आहे म्हणा. खरं तर हे असले पुरुषदिन साजरे करायची […]
सीट डाऊन – पाऊस आणि ‘ते’ मित्र
पाऊस आणि काही ‘ते’ मित्र यांच्यात मला फार साम्य वाटतं. आधीच सांगून टाकतो मला पाऊस आणि पावसाळा फार आवडत नाही. कवी किंवा लेखकाला पाऊस, ढग आणि पावसाळी वातावरण आवडू नये हा आपल्या (उरल्या सुरल्या) साहित्यिक समाजात फाऊल मानला जातो. काही काही लोक तर कुत्सित प्रश्न करतात “तू कवी आहेस आणि तुला पाऊस आवडत नाही!?” थोडक्यात त्यांना […]