प्राणायाम आणि मनुस्मृति प्राणायाम! भारतात (कदाचित आता जगात) प्राणायाम म्हणजे काय? हे माहित नसणारा माणूस क्वचितच सापडेल. आणि सापडल्यास आपणही त्याच्या ज्ञानात वृद्धी करू इतके प्राणायाम उपयुक्त आहे! अनेक योग गुरूंनी प्राणायामाबद्दल शिकवण दिलेली आहे. इतकेच काय, श्रीमद्भगवद्गीतेत देखील प्राणायाम आणि त्याचे योगातील महत्व सांगितलेले आहे. मनुस्मृति मध्ये देखील या इहपरलोकी उपयुक्त प्राणायामचे महत्त्व सांगितलेले […]
मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व
मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा […]
विंचू चावला – संत एकनाथ महाराजांची मूळ रचना आणि त्याचा भावार्थ
विंचू चावला -पार्श्वभूमी खरं सांगायचं तर सर्वसामान्य मराठी माणसाला संत एकनाथ महाराज आणि त्यांची भारुडे हा अपरिचित विषय नाही. त्यातून “विंचू चावला” हे भारूड तर न माहित असणं अत्यंत विरळाच. पण हा माझा समज दुर्दैवाने दूर झाला, जेव्हा एका तरुणीने सांगितले की तिला हे माहीतच नव्हते की “विंचू चावला” हे एक अध्यात्मिक काव्य आहे. आणि […]
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! (मूळ रचना) – संत एकनाथ महाराज
मित्रांनो आपण सर्वानीच “अरे कृष्णा अरे कान्हा” के काव्य कधी ना कधी ऐकले असेलच. शाहीर साबळे यांच्या भावस्पर्शी स्वरांतून आजही आपण या गीताचे स्मरण करतो. संत एकनाथ महाराजांची ही रचना. संत एकनाथ महाराज म्हणजे समाजातील आणि मुख्यतः माणसातील कुप्रवृत्तींवर परखड टीका करणारे संत कवि. सरळ साध्या सोप्या शब्दात त्यांनी अनेकदा आपली कानउघडणी केलेली आहे. हे […]
वैष्णव जन तो – मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर
लहानपणापासून आपण “वैष्णव जन तो” हे भक्तीगीत ऐकत आलेलो आहोत. हे काव्य थोर गुजराती संत, कवी आणि विष्णुभक्त नरसी मेहता (नरसिंह मेहता) यांनी रचलेले आहे. पण खूप कमी जणांना माहित आहे की, या सुपरिचीत भक्तिगीताचे मूळ शब्द वेगळे आहेत. महात्मा गांधींनी आपल्या गायनात वेगळे शब्द आणले. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर […]
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (भावार्थ)
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी अगदी सोप्या आणि थेट शब्दांत मनाची अवस्था, त्यानुरूप भासणारे जग आणि वस्तुस्थिती, याचे विवेचन केलेले आहे.
“महाबळी अतिबळी” – श्री समर्थ रामदास स्वामी रचित महाबळेश्वर विषयी काव्य
श्री समर्थ रामदास स्वामींचा महाबळेश्वर आणि परिसरावर काही विशेष स्नेह होता हे ऐतिहासिक सत्य आहे. समर्थांनी अनेक वर्षे महाबळेश्वर आणि परिसरात कर्म धर्म आणि राष्ट्रभक्ती यांसाठी कार्य केले. खालील काव्यात समर्थांनी महाबळेश्वर, महाबळेश्वराचा इतिहास व या भागात उपलब्ध फळे, फुले, वनस्पती, कंदमुळे व भाज्या यांचे वर्णन केलेले आहे. समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर हे काव्य रचले. यावरून […]
नारद उवाच | श्री गणेश स्तोत्र – मराठी अनुवादासह
नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥ प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥ लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव चसप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम् ॥३॥ नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥ द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥ विद्यार्थी लभते विद्यां […]
शनैश्चराची आरती – जय जय श्रीशनिदेवा
जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥ सूर्यसूता शनिमूर्ती ॥ तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं ॥ शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥ १ ॥ नवग्रहांमाजी श्रेष्ठा ॥ पराक्रम थोर तुझा ॥ ज्यावरी तूं कृपा करिसी ॥ होय रंकाचा राजा ॥ जय० ॥ […]
आवाहनं न जानामि – एका भक्ताची प्रार्थना
लोकांची अशी धारणा आहे की, परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे प्रत्येक वेळेस मोठ मोठे कर्मकांड, यज्ञ, याग करणे वगैरे. पण हे सत्य नाही. मनात भाव असला पाहिजे. भक्ती असली पाहिजे. या भक्तीपुढे सगळं काही फोल आहे. अशा वेळी अनेक भक्तांना प्रश्न पडतो की जर प्रार्थना येत नसेल, स्तोत्र माहित नसतील किंवा कुठले ग्रंथ माहित नसतील तर […]