त्याला परीघ बनवायची हौस, तिला रेष मारण्याची खोड. शेवटी मी त्यांच्यासाठी अनुभवांचे टिंब काढून दिले आणि म्हणालो आता खेळा! असतात अशा काही प्रश्नकाहूर केविलवाण्या वेळा. त्याने पहिले पाऊल उचलले. पण पाऊल पडण्याआधी तिने सरळ काही टिंबांना छेद दिला. तो स्तिमित झाला पण खचून न जाता काही परीघ बनवू लागला. बघता बघता त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. […]
व्यक्तिपूजा आणि भारतीय समाज
कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला.
भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर […]
शहाण्यांसाठी इसापनीती – सिंह प्रेमात पडतो!
ही आणखी एक इसापनीतीची कथा ज्यात सिंह प्रेमात पडतो आणि प्रेमाच्या आवेगात, भावनेच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेतो. या कथेचे तात्पर्य देखील हेच सांगितले जाते की “माणूस प्रेमात पडला किंवा भावनिक झाला की चुकीचे निर्णय घेतो”. पण हा उपदेश ज्यांना हे आधीच माहित आहे की “भावनेच्या भारत निर्णय घेतले की नुकसान होतं” त्यांना सांगून काय […]
शहाण्यांसाठी इसापनीती – वारा आणि सूर्य
इसापनिती मधील ही आणखी एक लोकप्रिय कथा “वारा आणि सूर्य”. तर कथा अशी आहे की एकदा वारा आणि सूर्य यांचे “अधिक ताकदवान कोण?” यावरून भांडण होते. दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होत नाही. त्यांचे भांडण चालू होते तोच एक माणूस अंगावर शाल पांघरून तिथून चालला होता. सूर्य वाऱ्याला म्हणाला, “तो बघ एक माणूस शाल पांघरून […]
शहाण्यांसाठी इसापनीती – ससा आणि कासव
मित्रांनो ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यावर नाना तऱ्हेची गाणी, बडबडगीते लिहिली आणि गेली गेलेली आहेत. लहान मुलांना देखील हे ठाऊक असते की शर्यत कोण जिंकला ससा की कासव? हे ही सगळ्यांना ठाऊक आहे की ससा गाफील राहिला म्हणून त्याला शर्यत जिंकता अली नाही. कासव त्याच्या “कूर्मगतीने” न थांबता चालत राहिला. […]
वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता) ~ कुसुमाग्रज
टापांचा आवाज, पंडितजींचे संगीत, लता दिदींचे स्वर, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शब्द आणि शूरवीरांच्या आठवणीने चढलेले स्फुरण. “वेडात मराठे वीर दौडले सात” हे शब्द कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. मराठ्यांचे असीम शौर्य, हिंदवी स्वराज्यासाठी केलेले बलिदान, देव देश आणि धर्मासाठी उचलेले खड्ग सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहतं. मराठी साम्राज्याचा गौरवशाली धगधगता इतिहास. आणखी एक माहिती […]
स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश..
स्त्रियांना मताधिकार आजच्या जगात स्त्रियांना मताधिकार असणे, त्यांनी मतदानात सक्रिय सहभाग घेणे इतकंच काय तर उमेदवार म्हणून उभे राहणे हे देखील एकदम सामान्य आहे. कोणालाच यात काहीच विशेष वाटत नाही. पण १९ व्या शतकापर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता हे किती जणांना माहित आहे? ज्या ज्या पाश्चात्य देशांना आपण “प्रगत” समजतो त्या देशांमध्येही स्त्रियांना मतदानाचा अधिकार अगदी आत्ता […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोडोली गावी मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून स्वराज्यात परत येत होते तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी विश्राम केला. अनेक लोकांनी, कुटुंबांनी आणि साधू-संतांनी त्यांची या प्रवासात मदत केली. वेषांतर केल्यामुळे त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हते. त्याच प्रवासातील हा एक रोचक किस्सा जेव्हा एका गावच्या पाटलीणबाई छत्रपती शिवाजी महाराजांवर भयंकर चिडल्या, त्यांना वाईट साईट बोलल्या. पण, […]
प्रवाह, परिस्थिती आणि नियती.. एक चिंतन
प्रवाहच थांबतो तिथे, जिथे तू उभी असतेस… प्रत्येक वळणावर भेटतेस, कधी साथ देतेस कधी उगाच हात सोडून हरवतेस.वाट असते पण मार्ग दिसत नाही. नशीब म्हणत म्हणत पुढे जाताना पुन्हा प्रत्येक मार्गावर तू दिसतेस…. मी थांबतेच पण पुन्हा पुन्हा तूला प्रश्न विचारावसा वाटतो, साथ देणार की हात सोडणार…?? सहज उत्तरतेस तू पुढे तर चाल, मी आहेच […]